.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सहा दिवस झाले आहेत. पण महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळाची कधी होणार घोषणा? याची महाराष्ट्र वाट पाहतोय. त्यातच आजची मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द झाली आहे. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा या आपल्या गावी जाणार असल्याची माहिती मिळतेय.