दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आपण पडतो अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आधी आपल्या मित्राची हत्या केली आणि हत्येचा कट लपण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किरकोळ वादातून एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो त्याच्या एका मित्रासोबत सावंतवाडीतील आंबोली घाटात आला. मृतदेहा अंबोली घाटात टाकत असतानाच मृतदेहासह तो डोंगराच्या उतारावरून खाली पडला. मात्र, त्याच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती बचावली.
मित्रांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून भाऊसो माने आणि त्याचा साथीदार तुषार पवार (28) यांनी सुशांत खिलारे (30) याची हत्या केली. तिघेही साताऱ्यातील कराड येथील रहिवासी आहेत. मित्राच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भाऊसो माने आणि त्याचा साथीदार तुषार पवार कारमधून 400 किमी अंतरावरील आंबोली घाटावर गेले. घाटात माने यांचा तोल गेला आणि मृतदेहासोबत पडून त्याचाही मृत्यू झाला.
या घटनेनंतर भाऊसो माने याच्यासोबत गेलेल्या तुषार पवारने कुटुंबीयांना फोन करून सर्व प्रकार सांगितला आणि गुन्ह्याची कबुली दिली. एका स्थानिक व्यक्तीने मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. उपनिरीक्षक अमित गोटे यांच्यासह बचाव कर्मचार्यांनी एकमेकांपासून थोड्याच अंतरावर असलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढले.
आंबोली घाटात राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो आणि कधीकाळी हे ठिकाण मृतदेह टाकण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यानंतर येथे अनेक पोलिसांकडून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या प्रकरणात सापडलेले दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.