मित्राशी थट्टा मस्करीत बोललो; शेतकरी कर्जमाफीबाबत 'त्या' विधानावर मंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण, व्यक्त केली दिलगिरी

Minister Manikrao Kokate : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असताना कर्जमाफीच्या पैशांचं काय करता? असा सवाल विचारत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
Manikrao Kokate
Manikrao Kokate sakal
Updated on: 

शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करतात असं विधान केलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असताना कर्जमाफीच्या पैशांचं काय करता? शेतीत गुंतवणूक करता का असे प्रश्न कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विचारले होते. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकाही होत होती. आता त्यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. मी शेतकऱ्यांबाबत असं विधान केलं नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

Manikrao Kokate
Latur Crime : मोठी बातमी! लातूर महानगरपालिका आयुक्तांचा स्वत:वर गोळी झाडून जीवन संपविण्याचा प्रयत्न, घटनेने शहर हादरले
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com