राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलंय
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलंय. ओबीसी राजकीय आरक्षण 25 वर्ष राज्यात लागू आहे. ओबीसी आरक्षणामुळे अनेकांना राजकारणात पुढे येण्याची संधी मिळत होती. पण, 25 वर्षानंतर कुणी तरी न्यायालयात जाते आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी करतं, हे चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण दिलं होतं, असं ते म्हणाले आहेत. (OBC agitation from Thursday said minister Chhagan Bhujbal)
ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही सर्वांची भूमिका होती. फडणवीस सरकारनेही केंद्राला जनगणना झाली तो डाटा द्यावा अशी मागणी केली होती. इम्पिरिकल डाटा सादर करायला न्यायालयाने सांगितले. शरद पवार जनगणना व्हावी यासाठी मंत्रिमंडळात आग्रही होते. ओबीसी आरक्षण थांबल्याने महाराष्ट्रात 60 हजार जागांवर परिणाम होणार आहे. मंडळ कमिशन, जनगणनेचा डाटा असतानाही न्यायालयाने इम्पिरिकल डाटा मागितला आहे. इम्पिरिकल डाटा घरी जाऊन गोळा करायला कोणी तयार होत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
पुढील सहा महिन्यातील निडवणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण आहे की नाही हा प्रश्न उभा राहिला आहे. समता परिषद अध्यक्ष म्हणून आम्ही आंदोलन करणार आहोत. हा राज्य आणि केंद्राच्या विरोधात मोर्चा नाही. ओबीसी आरक्षण वाचावे यासाठी ओबीसी समाजाचा आक्रोश मोर्चा असेल. गुरुवारपासून आक्रोश मोर्चा कोरोना नियम पाळून सुरू होतील, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षासाठीच्या मोर्चांना पाठिंबा दिला आहे. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असंही ते म्हणाले आहेत. मराठा समाजाचे आंदोलन रास्त आहे. यासाठी घटना दुरुस्ती करण्याची गरज आहे असे मला वाटते. पण, गेलेय ते मिळविण्यासाठी आमचा लढा असेल, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.