"काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचा गळा घोटला जात असेल तर....."

"शेतकर्‍यांवर अन्याय होत असताना मुख्यमंत्री गप्प का ?"
CM Uddhav Thackeray and Raju Shetty
CM Uddhav Thackeray and Raju Shettyटिम ई सकाळ

केंद्र सरकारने देशातील राज्यांना भूमी अधिग्रहन कायद्यामध्ये काही बदल करून अमलबजावणी करण्याच्या सुचना केल्या आहेत. या पार्श्वभुमीवर भूमी अधिग्रहन कायद्यासंदर्भात शरद पवार यांना भेटून शेतकऱ्यांच्या भावना मांडणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे पत्रकार परीषदेमध्ये दिली.

पत्रकार परीषदेमध्ये राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. "मी शेतकर्‍याच्या बाजूने असल्याचं म्हणता मग तुमच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शेतकर्‍यांवर अन्याय होत असताना तुम्ही गप्प का आहात?", असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना भेटून विचारणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने दोन परिपत्रके काढली. त्यानुसार शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या तर त्यामधून मिळणारी रक्कम अन्यायकारक असेल. काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर आम्ही भविष्यात गप्प बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com