आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी! तर्क-वितर्क व चर्चा

amit shah and uddhav thackeray
amit shah and uddhav thackerayesakal

औरंगाबाद : Marathwada Liberation Day 2021 in Maharashtra मराठवाड्यात आज शुक्रवारी (ता.१७) सर्वत्र मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. या निमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या (marathwada) दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) देखील आहेत. आज दिवसभर औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. आज (ता.१७) औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा; शिवसेना-भाजपा एकत्र येण्याचे संकेत?

"व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मातांनो आजचं हे व्यासपीठ आणि कार्यक्रम पाहून मला समाधान आहे की आपण सगळेच जण राजकारण बाजूला ठेऊन जनतेच्या हिताच्या गोष्टी आपण करत आहोत. नाहीतर मराठवाडा मुक्तीदिन साजरा करायचा आणि आपापसात भांडण करायचं. मग निजामाला कशाला घालवलं? नालायकपणे कारभार करून आपणही तसेच वागत राहिलो, तर त्या आणि या राजवटीमध्ये काय फरक राहिला? अपेक्षा एकमेकांकडून असणारच आहेत” असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात आज (ता.१७) केले. परंतु त्यापैकी “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केल्याने वेगवेगळे तर्क काढले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिलं. यावेळी व्यासपीठावर मागे रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे देखील उपस्थित होते. त्यामुळे या विधानावरून राजकिय तर्क-वितर्कांना उधाण झाला.

amit shah and uddhav thackeray
Live : राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं - फडणवीस

चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान, गुरुवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा अर्थ लावला जात आहे. पुण्यात एका खासगी दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला माजी मंत्री न म्हणण्याचा उल्लेख केला होता. “मला माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांत कळेल तुम्हाला“, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे आधी चंद्रकांत पाटील यांचं विधान आणि त्यापाठोपाठ आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याच्या शक्याशक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे.

amit shah and uddhav thackeray
मोदींच्या तोडीचा दुसरा नेता दिसत नाही - संजय राऊत

दोघांची युती होईल ते आज मला दिसत नाही.- फडणवीस

राजकारणात कधीही काही होऊ शकतं. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. हे तिन्ही पक्षांचं अनैसर्गिक गठबंधन चालू आहे. ते फार काही टीकू शकणार नाही. महाराष्ट्राचं नुकसान होतंय. म्हणून त्यांनी मनातील भावना बोलून दाखविली. पण दोघांची युती होईल ते आज मला दिसत नाही. सरकार बनविण्यासाठी भाजपची मानसिकता नाही. भाजप सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत. लोकांच्या मनातील आशा घेऊन सरकारविरोधात आंदोलन करत आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की ते कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करताएत. हे त्यांना समजलं, असे फडणवीस म्हणाले.

या विधानावरून तर्क करणं योग्य नाही- प्रविण दरेकर

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कुरघोड्यांचं राजकारण करू नये, मला भाजपासोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. या विधानावरून तर्क करणं योग्य नाही. काल चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं, त्यावर उद्धव ठाकरेंनी केलेली ही मिश्किल टिप्पणी आहे. त्यातून आलेलं हे विधान मला वाटतंय. अशी प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com