राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच आज भाजप नेते आशिष शेलार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सकाळी भेट झाली यावेळी या दोन नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शेलारांनी ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याच्या चर्चा आहेत. भविष्यातील लोकसभा आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांदरम्यान भाजप मनसेला सोबत घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याबाबत आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले की, 'माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळी निवडणुकीवर बोलायचं आहे तेव्हा मी निवडणुकीवर बोलेल.'
पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या भेटीवर आणि चर्चेवर बोलणं टाळल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, आज सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली. यापूर्वी देखील राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटी झालेल्या आहेत. ही भेट नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अधिकृतरित्या पुढे आलेलं नसलं तरी दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आहे. शेलारांनी ठाकरेंना केंद्रीय नेतृत्वाचा निरोप दिल्याचं बोललं जात आहे. 'टीव्ही ९ मराठी'ने याबाबत वृत्त दिले.
भविष्यातील लोकसभा आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांकडे भाजपने लक्ष्य केंद्रित केल्याचं दिसून येतंय. त्यामुळे मनसेला सोबत घेऊन भाजप येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाण्याची चिन्हं दिसून येत आहेत. भाजपकडून कायमच मनसेचं स्वागत करण्यात येत आहे. मात्र मनसे काय भूमिका घेणार, यावर सगळी राजकीय गणितं अवलंबून आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.