Raju Shetti l कोल्हापुरात राजू शेट्टी करणार महाविकास आघाडीची चिरफाड

राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली-राजू शेट्टी
raju shetty
raju shettysakal

महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने आपल्या कार्यकाळात शेतकरी विरोधी निर्णय घेतले आहेत. त्याची चिरफाड कोल्हापूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये करणार असल्याचा इशारा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला. आज बारामती दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

raju shetty
यशवंत जाधव प्रकरणी एकनाथ शिंदे म्हणाले, राजकीय सूडापोटी कारवाई नको

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, अतिवृष्टी मध्ये २०१९ च्या तुलनेत शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन सरकारने दिले. मात्र याची पूर्तता केली नाही. उलट राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे या सरकारमध्ये थांबायचे का नाही हे या बैठकिनंतर ठरणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

raju shetty
'काश्मीर सोडा.. यशवंत जाधवांवर बोला', भातखळकरांचा राऊतांना टोला

महाविकास आघाडी निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. ऊसाच्या एफआरपीचा मुद्दा, बाजार समिती मधून शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा मुद्दा, याचबरोबर या सरकारने भूमि अधिग्रहण कायदा दुरुस्ती करून शेतकऱ्याचा मोबदला ७० टक्‍क्‍यांनी कमी केला असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com