सांगली: देशाचं राजकारण वेगळ्या दिशेला जात आहे. धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचं काम सध्या सुरू आहे. देशासाठी जे हुतात्मा झाले त्यांच्यावर टीका करणारे नेतृत्व देशात बघायला मिळतंय. त्यामुळे देशात अस्वस्थता आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) केली आहे. आज सांगलीत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, सध्या धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. देशासाठी खपणाऱ्याचा मान सन्मान केला जात नाही. त्यामुळे सामाजिक एकोपा कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी धर्मांधवृत्ती विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्याची गरज आहे. राज्यकर्तेच देशात कटुता निर्माण करत असतील तर देश कसा पुढं जाणार असा पश्नही त्यांनी उपस्थित केला.
मोदी सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, उपेक्षितांच्या सन्मानाचं राजकारण होण्याची गरज आहे. देश वेगळ्या विचार सारणीच्या हातात गेल्यामुळे स्वातंत्र्यासाठी बलीदान देणा-या गांधी, नेहरू घराण्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. ऊस शेती विषयीची शेतक -यांची मानसिकता बदलल्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे त्यामुळे साखर कारखाने जून पर्यंत चालणार आहेत. साखर उत्पादन जास्त होत असल्यामुळे साखर जास्त दिवस गोडावूनला राहत आहे. परिणामी कारखान्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यासाठी कारखान्यांनी साखरे शिवाय इथेलॉन निर्मीती सह इतर उपपदार्थ निर्मिती वर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.