श्री सिद्धेश्वर कारखाना जुन्या चिमणीवर करणार ऊस गाळप! महापालिका अन्‌ एअरपोर्ट ॲथॉरिटीकडूनही मिळेना चिमणीला परवानगी

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने ‘NTPC’च्या धर्तीवर विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ६० मीटर चिमणी उभारणीलाही परवानगी मागितली. परंतु, दोन्हीकडून परवाना मिळाला नसल्याने आता जुन्या चिमणीवरून गाळप करता येईल का?, यादृष्टीने कारखान्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
Karkhana
Karkhanasakal

सोलापूर : आगामी हंगामात शेतकऱ्यांकडील उसाचे गाळप करता यावे, या हेतूने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने महापालिकेकडे ३० मीटर चिमणी बांधणीसाठी परवानगी मागितली आहे. दुसरीकडे ‘एनटीपीसी’च्या धर्तीवर विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ६० मीटर चिमणी उभारणीलाही परवानगी मागितली. परंतु, दोन्हीकडून परवाना मिळाला नसल्याने आता जुन्या चिमणीवरून गाळप करता येईल का?, यादृष्टीने कारखान्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ९२ मीटर अनधिकृत चिमणी विमानतळास अडचणीची ठरत असल्याने महापालिकेच्या वतीने ती १५ जून रोजी जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी कारखान्याने त्याच जागेवर ३० मीटर चिमणी नव्याने बांधायला परवानगी मागितली. त्यासाठी महापालिकेने मागणी केलेला प्रत्येक कागद कारखान्याने सादर केला. तरीदेखील चिमणी उभारणीला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

दुसरीकडे विमानतळावरून नाईट लॅण्डिंग शक्य नसल्याने आम्ही विमानतळ विकास प्राधिकरणाकडे एनटीपीसीप्रमाणे ६० मीटर चिमणी उभारणीला परवानगी द्यावी, अशीही मागणी केल्याचे कारखान्याचे तज्ज्ञ मागदर्शक धर्मराज काडादी म्हणाले. मात्र, कोणाकडूनही परवानगी न मिळाल्याने आता नवीन चिमणी बांधून गाळप घेणे अशक्य आहे. त्यामुळे पूर्वीच्या जुन्या चिमणीवरून गाळप शक्य होईल का, किती मेट्रिक टन गाळप दररोज होऊ शकते, याची चाचपणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्ज करूनही मिळेना परवानगी

शेतकऱ्यांचा कारखाना बंद राहू नये, यासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. विमानतळ विकास प्राधिकरण व महापालिका, यांच्याकडे नवीन चिमणी उभारणीसाठी परवानगी मागूनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे जुन्या चिमणीवर गाळप घेण्यासंदर्भातील नियोजन केले जात आहे.

- धर्मराज काडादी, तज्ज्ञ सल्लागार, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना, सोलापूर

कारखान्याकडे २२ लाख मेट्रिक टन उसाची नोंद

नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या गाळप हंगामासाठी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांनी २० ते २२ लाख मे.टन उसाची नोंदणी केली आहे. पण, आता पावसाचा मोठा खंड पडल्याने वजनात मोठी घट होवू शकते. त्यामुळे अंदाजे १५ लाख मेट्रिक टनापर्यंत नोंद गृहीत धरून कारखान्याने गाळप हंगामाचे नियोजन सुरू केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com