...तर शेवटच्या पाच मिनिटांत निवडणूक मारणार; बच्चू कडूंचा इशारा

राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला सूचक इशारा केला आहे.
Bacchu kadu Latest News
Bacchu kadu Latest Newsgoogle

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुका चार दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. याचदरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सूचक इशारा दिला आहे. धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारने केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम राज्यसभेच्या निवडणुकांवर दिसून येतील असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

(Bacchu Kadu On Rajyasabha Election)

केंद्राने हरभऱ्याची खरेदी सुरू करावी त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी अन्यथा राज्यसभेसाठी मतदान करणार नाही, आघाडीलासुद्धा शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू असा इशार बच्चू कडू यांनी दिला आहे. "संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख आहे आणि धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. आणि आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी हात वर करत आहे." असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत.

"यासंदर्भात मुंख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. आणि केंद्र सरकारने खरेदी नाही केली तर एका हेक्टरला जार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे नाहीतर राज्यसभेची निवडणूक आम्ही शेवटच्या पाच मिनिटांत मारणार आहोत." असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. दरम्यान १० जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडत असून त्यामध्ये सातव्या उमेदवारासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान बच्चू कडू यांनी अशा इशारा केल्यावर राज्य सरकार काय पाऊले उचलणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com