नवाब मलिकांचा राजीनामा नाहीच; भुजबळांकडून सरकारची भूमिका स्पष्ट

शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं स्पष्ट केली भूमिका
Chaggan Bhujabl_Nawab Malik
Chaggan Bhujabl_Nawab Malik

मुंबई : नवाब मलिक यांच्याकडून सातत्यानं भाजपाच्या चुकीच्या कारवायांविरोधात बोलत आहेत. भाजपकडून कसा अन्याय होतोय हे सांगत आहेत. त्यामुळं त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीची भूमिका मांडली. नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं आपली भूमिका स्पष्ट केली.

भुजबळ म्हणाले, ही दुर्देवाची गोष्ट आहे की, पहाटे नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. तिथून त्यांना घेऊन ते सकाळी सहा वाजत्या आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. यानंतर चौकशी करुन त्यांना कोर्टात घेऊन गेले. दरम्यान, सन १९९२ सालच्या घटना तसेच सन १९९९ सालच्या जागेचा करार आणि त्यानंतर बारा वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. तत्पूर्वी या घटनांमध्ये अनेकांवर कारवाया झाल्या पण यामध्ये नवाब मलिकांचं नाव कुठेही नव्हतं. मग आत्ताच त्यांच्यावर कारवाई का केली जातेय. तर नवाब मलिक हे सातत्यानं भाजपाच्या चुकीच्या कारवायांविरोधात बोलत आहेत. भाजपकडून कसा अन्याय होतोय हे सांगत आहेत. त्यामुळं त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Chaggan Bhujabl_Nawab Malik
Podcast: नवाब मलिक यांना अटक, ईडीची कारवाई ते पेपर फुटीचं प्रशिक्षण बिहारमध्ये

शरद पवार, मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची आणि तिन्ही पक्षांची एकत्रिपणे बैठक झाली. यामध्ये या अन्यायाविरोधात कायदेशीररित्या आणि जनतेत जाऊन आम्ही मुकाबला करायचं ठरवलं आहे. त्यानुसार उद्या दहा वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तिन्ही पक्षांचे मंत्री आणि नेते निषेध म्हणून धरणं आंदोलन करणार आहोत. त्यानंतर परवापासून राज्यभर तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन तालुका, जिल्हा आणि शहर पातळीवर विविध प्रकारे शांततेनं आंदोलन होईल.

Chaggan Bhujabl_Nawab Malik
नवाब मलिक प्रकरणानंतर ममतांचा पवारांना फोन; केली महत्त्वाची चर्चा

नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपचं आरोप केले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंना देखील अटक झाली होती, मग त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता का? केंद्रीय यंत्रणा विशिष्ट हेतून काम करत आहे हे सर्व देशाला माहिती आहे. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळं जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची शिक्षा आम्ही तरी करणार नाही. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले ती परिस्थिती वेगळी होती. कारण मंत्र्यांचे राजीनामे घेऊन एक विकेट पडली दुसरी पडली अस सांगण्याचा आसुरी आनंद आम्ही भाजपला घेऊ देणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com