

Unseasonal heavy rain and hailstorm hitting Maharashtra and South India scientific reasons here
esakal
भारतात सध्या होत असलेल्या या अवेळी पावसामागे केवळ स्थानिक ढग नसून जागतिक हवामान बदलाचे धागेदोरे जोडलेले आहेत. ताज्या संशोधनानुसार यामागे ४ प्रमुख वैज्ञानिक कारणे आहेत
उत्तर भारतातून येणारे वेस्टर्न डिस्टर्बन्स (पश्चिमेकडील चक्रावात) सहसा हिवाळ्यात सक्रिय असतात. मात्र भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या या बाष्पयुक्त वाऱ्यांची तीव्रता आता उन्हाळ्याच्या सुरुवातीपर्यंत टिकून राहत आहे. आर्क्टिक प्रदेशातील तापमान वाढल्यामुळे जेट स्ट्रीम (उंच आकाशातील वारे) विचलित होत आहेत परिणामी हे चक्रावात दक्षिणेकडे सरकून थेट महाराष्ट्र आणि दक्षिण भारतापर्यंत पाऊस घेऊन येत आहेत.