अनिरुद्धने दिला अरुंधतीला दुसऱ्या लग्नाचा सल्ला.. अरुंधती म्हणाली..

'आई कुठे काय करते' ही मालिका अत्यंत रंजक वळणावर असून अरुंधती दुसऱ्या लग्नाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
aai kuthe kay karte aniruddha gives advice to arundhati for marriage with ashutosh
aai kuthe kay karte aniruddha gives advice to arundhati for marriage with ashutosh sakal

Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह (star pravah) वरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत दररोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अरुंधतीचा मित्र आशुतोष याचा अपघात झालेला दाखवला आहे. अशा काळात त्याला अरुंधतीच्या पाठिंब्याची गरज आहे. तर अरुंधतीलाही त्याची मनापासून काळजी वाटत आहे. लवकरच त्या दोघांचा विवाह होईल अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये असतानाच मालिकेला एक मोठे वळण मिळाले आहे.

aai kuthe kay karte aniruddha gives advice to arundhati for marriage with ashutosh
PHOTO : हृता दुर्गुळे झाली 'मिसेस शाह'.. पाहा लग्नाचा शाही थाट

आशुतोषचा अपघात झाल्यानंतर खचून गेलेल्या अरुंधतीला पाहून अनिरुद्ध देखील दुःखी झाला आहे. यावेळी अनिरुद्ध पहिला नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून अरुंधतीच्या सोबत उभा राहतो. 'तुला तुझं भविष्य आशुतोषसोबत दिसत असेल, तर त्याच्याशी लग्न कर,' असा सल्ला अनिरुद्ध अरुंधतीला देतो. आजवर आमच्या साठी खूप केलं आता स्वतःसाठी जग असं तो तिला सांगतो. अनिरुद्धचे हे वागणे चाहत्यांना मोठा धक्का देणारे आहे.

तर घरी देखील या प्रकरणावरुन वाद सुरु असतात. कारण अरुंधतीच्या पुन्हा शिक्षण घेण्याच्या निर्णयामुळे विरोधात गेलेली इशा, आशुतोषशी असलेल्या मैत्रीमुळे अभिकडून मिळणारा रोष आणि कांचनचा असलेला राग याच्या कचाट्यात अरुंधती सापडते. आशुतोषशी लग्न करणार का यावरून तिला नको ते बोललं जातं. पण यावेळी अरुंधती गप्प न राहता स्वतःचे ठाम मत मांडते.

आगामी भागात दिसेल की, अरुंधती सगळ्यांना सडेतोड उत्तर देते. ती म्हणते, 'मी लग्नासाठी अजिबात उतावीळ नाही. एकदा लग्न करून माझी हौस भागली. मनसोक्त संसार केलाय. आता माझी पुन्हा इच्छा नाही. पण, याचा अर्थ असा होत नाही की, मला आयुष्यभर जोडीदाराची गरजच भासणार नाही. जेव्हा भासेल, तेव्हा मी त्याचा नक्की विचार कारेन. मग तिथे आशुतोष असला तर त्याचाही विचार करेन. पण आता आमच्यात फक्त मैत्री आहे. आणि लग्न करूनही ती टिकतात असं नाही,' असं अरुंधती म्हणते. अरुंधतीच्या बोलण्यातून अनिरुद्ध आणि संजनालाही ती बऱ्याच गोष्टी सूचित करत असते. या प्रसंगातून अरुंधती आशुतोष बाबत विचार करू लागली आहे हे दिसते. त्यामुळे आता अरुंधती दुसऱ्या लग्नाबाबत कधी स्पष्ट भूमिका घेणार याची उत्कंठा लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com