सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि खेळाडू विराट कोहली (virat kohli). दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. विराट आणि अनुष्का यांनी 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्का आणि विराटला कन्यारत्न झाले. तिचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले. वामिकाच्या जन्माआधी अनुष्काने विराटसमोर एक अट ठेवली होती. अनुष्काने विराटला सांगितले होते की, सामान्य मुलांप्रमाणे तिच्या मुलांचा सांभाळ झाला पाहिजे. विराटच्या आणि तिच्या कामाचा कोणताही परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला नाही पाहिजे, याकडे विराटचे लक्ष असले पाहिजे.(before becoming a mother anushka sharma put one condition to virat kohli)
विराटने देखील त्यांच्या मुलांबद्दल एक गोष्ट शेअर केली आहे. विराट कोहली म्हणाला, 'गेल्या काही वर्षांमध्ये अनुष्कामुळे माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. माझे स्वतःचे जीवन आहे. माझी फॅमिली आहे. माझ्या मुलांसोबत वेळ घालवण्याचा मला पूर्ण हक्क आहे. मी माझ्या करियर आणि कामाच्या गोष्टी कधीच घरी शेअर करत नाही. माझे पुरस्कार देखील घरात नसतील कारण जेव्हा मुले मोठी होतील तेव्हा त्यांना असे नको वाटायला की ते एका सेलिब्रिटींच्या घरातील आहेत'
विराट आणि अनुष्काने वामिकाला सोशल मीडिया आणि लाइमलाईटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. वामिकाचा चेहरा सोशल मीडियापासून दूर राहिल याची काळजी विराट आणि अनुष्का घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.