Bilkis Bano Case: 'लाज वाटते जेव्हा...' शबाना आझमींना आलं रडू!

बिल्कीस बानो प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना रडू आले आहे. देशभरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले होते.
Bilkis Bano Case news
Bilkis Bano Case news esakal

Bilkis Bano Case: बिल्कीस बानो प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना रडू आले आहे. देशभरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले होते. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेची सुनावणी (Viral News) झाल्यानंतर त्याप्रकरणावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूड सेलिब्रेटींकडून देखील त्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गुजरात सरकारनं त्याप्रकरणातील आरोपांनी माफ करुन त्यांना सोडण्यात येणार (Social Media Viral News) असल्याचे सांगितले आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी बिल्किस बानो प्रकरणावर टिप्पणी केली होती. आपण त्यावर नाराज असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यात आता त्यांची पत्नी शबाना आझमी यांचे नाव जोडले गेले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी त्या भावूक झाल्याचे दिसून आले. त्या म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशात काय होते आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आपण नेमक्या कोणत्या काळात जगतो आहोत याचा प्रश्न पडला आहे. कशाप्रकारे लोकांची मानसिकता तयार होते आहे हेही अभ्यासणे गरजेचे आहे. बिल्किस बानो प्रकरणात जे झालं ते भयंकर चीड आणणारे होते. आपल्या संवेदना एवढ्या बधीर झाल्या आहेत का... असा प्रश्न आझमी यांनी यावेळी उपस्थित केला.

लोकांची समज अजुनही कमीच आहे की काय असे वाटते. बिल्किस बानो प्रकरणात आरोपींना सोडण्यात आले एवढी भयानक परिस्थिती पाहून वाईट वाटते. मला तर लाज वाटते या साऱ्या गोष्टींची. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी आपण करतो पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे पाहायला हवे. अजुनही रोज गावात, शहरांमध्ये ते अत्याचार सुरु आहेत ते आपण कसे थांबवणार आहोत, मी जेव्हा या साऱ्या परिस्थितीकडे पाहते तेव्हा रडायला येते असे आझमी यांनी म्हटले आहे.

Bilkis Bano Case news
ऋषीपंचमीचा खगोलशास्त्राशी काय आहे संबंध?

त्या लोकांनी जे राक्षसी कृत्य केले ते आपण कसे काय विसरु शकतो, त्यांना दोषमुक्त केल्यानंतर फिर्यांदीच्या कुटूंबियांना कसे वाटले असेल, त्यांनी काय करायचे, निर्भयाच्या वेळी आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून अख्खा देश उभा राहिला होता. यावेळी पण त्याचीच गरज आहे. हे मला आवर्जुन सांगायचे आहे. असे शबाना आझमी यांनी म्हटले आहे.

Bilkis Bano Case news
लालबागचा राजा आणि आदेश बांदेकरांच्या शिवसेना प्रवेशाचं कनेक्शन, वाचा Exclusive मुलाखत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com