बायकोच शेवटी! काम करुन घरी गेल्यावर ऐश्वर्या तर... इतक्या वर्षांनी अभिषेक बोलला

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या (Aishwarya Rai) हे दोन्ही लोकप्रिय कलाकार आहेत.
abhishek and aishwarya
abhishek and aishwaryaTeam esakal

Bollywood News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या (Aishwarya Rai) हे दोन्ही लोकप्रिय कलाकार आहेत. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये त्यांचा बोलबाला आहे. जगप्रसिद्ध ओफ्रा विन्फ्रेच्या शोमध्ये देखील त्यांना जाण्याची संधी मिळाली होती. (Bollywood Actress) बॉलीवूडमध्ये या कपल्सची नेहमीच चर्चा होत असते. लग्न झाल्यानंतर ऐश्वर्यानं काही चित्रपट केले मात्र त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अजूनही ती वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. (Entertainment News) आता ती प्रसिद्ध दिग्दर्शक मनिरत्नम यांच्या एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दरम्यान अभिषेक बच्चनचा एका मुलाखतीतील किस्सा व्हायरल झाला आहे.

अभिषेकनं त्या मुलाखतीतून बायको शेवटी बायकोच असते. ऐश्वर्याही त्याला अपवाद नाही. असं विधान केलं आहे. आमच्यात खुप चांगला संवाद आहे. आम्ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत असतो. असं असलं तरी नवरा बायकोतील वाद आमच्यातही होत असतात. मात्र ऐश्वर्या नेहमीच समजुतीची भूमिका घेताना दिसते. आम्ही एकमेकांना नेहमीच प्रोफेशनली आणि पर्सनल लेव्हलवर सपोर्ट करतो. ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. तो आमच्यातील मोठा भाग आहे. त्यामुळे वाद होणायापेक्षा संवादावर भर देणे हे दोघांनीही लक्षात ठेवले आहे. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्यासोबतच्या प्रवासाविषय़ीच्या काही आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला एक बरं आहे ते म्हणजे ऐश्वर्या देखील फिल्म इंडस्ट्रीमधून आली आहे. त्यामुळे तिला माझं काम, त्यातील अडचणी याविषयी माहिती आहे.

abhishek and aishwarya
RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

अभिषेकनं बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ऐश्वर्या खुप चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी हँडल करते. ऐश्वर्या ही मला बॉलीवूडमध्ये सिनिअर आहे. त्यामुळे काही गोष्टींबाबत मला मदत हवी असल्यास मी तिच्याशी बोलून निर्णय घेतो. ज्याचा मला फायदाच होतो. जेव्हा सगळं काम संपवून मी घरी येतो तेव्हा तो आव्हानात्मक दिवस पार पडल्यानंतर आम्ही त्यावर मोकळेपणानं बोलतो. त्यावर चर्चा करुन ते काम आणखी प्रभावीपणे करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आमच्यात जेव्हा भांडणं होतात तेव्हा मला सावरण्याचे काम ऐश्वर्याचे असते. मी कितीही रागात असलो तरी ती समजून घेते. ही मोठी गोष्ट आहे. अनेकदा रागाच्या भरात तुम्ही मनात साचलेलं सारं काही बोलुन टाकता. मात्र मी अजुनपर्यत ऐश्वर्याला रागाच्या भरात असं काही बोलताना पाहिलेलं नाही, हे अभिषेकनं मुलाखतीत सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com