जावेद अख्तर पुन्हा कडाडले, ' किती लाजिरवाणी गोष्ट'

काही झालं तरी ते आपल्याला जे चूकीचे वाटते त्याविरोधात सडकून टीका करणं, त्यावर बोलत राहणं हे काही बॉलीवूडमधील सेलिब्रेटींचे काम आहे.
जावेद अख्तर पुन्हा कडाडले, ' किती लाजिरवाणी गोष्ट'

मुंबई - काही झालं तरी ते आपल्याला जे चूकीचे वाटते त्याविरोधात सडकून टीका करणं, त्यावर बोलत राहणं हे काही बॉलीवूडमधील सेलिब्रेटींचे काम आहे. त्यात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (javed akhtar) हे नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शहा देखील आहे. या दोन्ही सेलिब्रेटींनी काही दिवसांपासून तालिबान्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. तालिबानी आणि हिंदूत्ववाद्यांची तुलना अख्तर यांनी यावेळी केली होती. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर भारतातही काही संघटनांमध्ये तालिबानी विचारसरणी पाहायला मिळते. असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण त्यांनी तालिबानी राजवटीत तेथील महिलांवर जे अन्याय होतो आहे त्यावरुन कुणी काही बोलायला तयार नाही. जे होत आहे ते अतिशय घृणास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

जावेद अख्तर यांनी जे व्टिट केलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की, त्या तालिबानच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, महिला या मंत्री होण्यासाठी नव्हे तर अत्याचारासाठी आहेत. त्यांनी घरी बसून मुलांना जन्म द्यावा. मात्र आपल्याकडील काही लोकशाहीवादी देश अशा तालिबान्यांशी हात मिळवण्यासाठी तयार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणावं, असा प्रश्न पडतो. आपल्याला थोडी का होईना लाज वाटायला हवी. अशा शब्दांत अख्तर यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांनी तीव्र शब्दांत मतं व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जावेद अख्तर यांनी तालिबानमध्ये होणाऱ्या अराजकतेच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीवरही सडकून टीका केली आहे. त्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहे.

जावेद अख्तर यांनी जगातील मुस्लिम देशांना तालिबानच्या अशा नव्या फतव्याबद्दल आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. तालिबान जर अशाप्रकारे महिलांना वागणूक देणार असेल तर भविष्यात या देशांतील वातावरण कशाप्रकारे असेल याची कल्पना आपण करावी. त्यामुळे आताच विविध मुस्लिम संघटनांनी पुढे येऊन त्या दहशतवादी विचारांचा विरोध करायला हवा. असेही अख्तर यांनी म्हटले आहे. सध्या जावेद अख्तर सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहेत. त्यांनी तालिबानच्या विरोधात केलेल्या प्रतिक्रियेंना सोशल मीड़ियावर मोठ्या प्रमाणात वाचक मिळताना दिसतो आहे.

जावेद अख्तर पुन्हा कडाडले, ' किती लाजिरवाणी गोष्ट'
भारत कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही कारण... - जावेद अख्तर
जावेद अख्तर पुन्हा कडाडले, ' किती लाजिरवाणी गोष्ट'
अखेर कंगना कोर्टात हजर : जावेद अख्तर मानहानी प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com