मुंबई- कृषी कायद्यांमध्ये बदल करण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारची भेट घेतली. मात्र विज्ञान भवनात आठ तास चाललेली ही बैठक अखेर निष्फळ ठरली. या बैठकीत कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे देखील हजर होते. या बैठकीदरम्यान जेवणाच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून सरकारचं जेवण नाकारण्यात आलं. अन्नदात्यांच्या या कृत्याचं अनेक स्तरांतून कौतुक करण्यात आलंय. अभिनेते प्रकाश राज यांनी देखील शेतक-यांच्या या कृत्याचं समर्थन केलं आहे.
“आम्ही सरकरी जेवण किंवा चहा स्वीकारणार नाही. आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे”, अशी भूमिका चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून घेण्यात आली. त्यांच्या या भूमिकेची प्रकाश राज यांनी स्तुती केली आहे. “याला म्हणतात खरा आत्म सन्मान” असं म्हणत त्यांनी शेतकरी आंदोलनाला त्यांचा पाठिंबा दिला आहे.
गुरूवारी झालेल्या बैठकीत शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यांवर ३९ आक्षेप केंद्रीय मंत्र्यांसमोर नोंदवले. त्यातील आठ आक्षेपांवर पुनर्विचार करण्याची व दुरुस्ती करण्याची तयारी मंत्र्यांनी दाखवली. शेतकऱ्यांचे आक्षेप मान्य असतील तर कायदे रद्द करण्याची मागणीही मान्य करावी, असे शेतकरी नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले, अशी माहिती राष्ट्रीय किसान महासंघाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी दिली. या बैठकीत, पंजाबसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी ४१ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
prakash raj farmers protest in delhi
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.