Aishwarya Rai : 'भोपळ्यासारखी तोंड असणाऱ्यांनी....'! ऐश्वर्या ट्रोल होताच रिचानं नेटकऱ्यांचे टोचले कान

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही काही दिवसांपूर्वी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली होती.
Aishwarya Rai Bollywood Actress and Richa Chadha
Aishwarya Rai Bollywood Actress and Richa Chadhaesakal

Aishwarya Rai Bollywood Actress : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही काही दिवसांपूर्वी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली होती. तिनं पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केले होते. त्यातील काही फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन ऐश्वर्याला ट्रोल करण्यात आले होते. या सगळ्यात अभिनेत्री रिचानं ऐश्वर्याची बाजू घेतली आहे.

यापूर्वी ऐश्वर्या आणि रिचानं सरबजितमध्ये एकत्र काम केले होते. त्या चित्रपटामध्ये रणदीप हुडानं केलेली भूमिका लोकप्रिय ठरली होती. रणदीपच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर कौतुकही झाले होते. ऐश्वर्या जेव्हा त्या पॅरिसच्या रॅम्प वॉकमध्ये सहभागी झाली होती तेव्हा तिला ट्रोल करण्यात आले होते. या सगळ्यावर ऐश्वर्यानं तिला ट्रोल करणाऱ्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

फुकरे तीन मधून भोली पंजाबनच्या भूमिकेत असणाऱ्या रिचाची लोकप्रियता मोठी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. रिचा ही नेहमीच तिच्या सडेतोड प्रतिक्रियेसाठी ओळखली गेलेली सेलिब्रेटी आहे. एका मुलाखतीमध्ये रिचाला ऐश्वर्या रॉयच्या ट्रोलिंगवरुन प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिचे मत काय त्यानंतर रिचानं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

रिचानं कडक शब्दांत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. ती म्हणते, जे जळतात त्यांना जळू देत, भोपळ्यासारखी तोंड असणारी लोकं ऐश्वर्यावर जळतात. तिचा द्वेष करतात. जी महिला भारतातील सर्वात सुंदर महिला आहे तिच्याविषयी लोकं चांगली बोलत नाहीत याविषयी आपण आणखी काय बोलायचे, ऐश्वर्याजी खूपच शिस्तप्रिय आहे. ग्रेसफुल आहेत. त्या कधीही कुणाविषयी वाईट बोलत नाहीत.

Aishwarya Rai Bollywood Actress and Richa Chadha
Aarya Season 3 Review : वाघीण आहे ती तिच्या पिलांना काही करायला जालं तर...! सुष्मितानं जिंकून घेतलं

साऊथ इंडियन बॅकग्राउंडच्या ऐश्वर्याजी घरात बसून दही भात खाणाऱ्यांमधील आहेत. त्यामुळे त्यांना का जाणून बुजून ट्रोल केले जाते हे कळायला मार्ग नाहीत. मला एक कळत नाही जे लोकं आम्हाला ट्रोल करतात त्यांचा एवढा विचार का करायचा हेच कळत नाही. अमूक एखादा वेगळ्या राज्यात बसून तुम्हाला ट्रोल करतो याचे तुम्ही कशाला मनावर घेता, त्यामुळे दुर्लक्ष करणे हेच सगळ्यात महत्वाचे. असेही रिचानं म्हटले आहे.

पहिल्यांदा मला खूप वाईट वाटायचे जे कुणी ट्रोल करतात त्यांच्याविषयी. नंतर मला या गोष्टींचे वाईट वाटेनासे झाले. मी फारसा विचार कधी केला नाही. ऐश्वर्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांच्यावर अनेकजण जळतात. त्यांचा द्वेष करतात हे सांगितले पाहिजे. असेही रिचानं यावेळी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com