लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा-नाग चैतन्यने जाहीर केला घटस्फोट

दोघांनी सोशल मीडियावर लिहिली पोस्ट
samantha naga chaitanya
samantha naga chaitanya

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu आणि नाग चैतन्य Naga Chaitanya यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथा आणि नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. नात्याला आणखी एक संधी देण्यासाठी या दोघांनी वैवाहिक सल्लागारांची मदत घेतली होती. समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून 'अक्किनेनी' हे आडनाव काढून टाकलं, तेव्हापासून या चर्चांना सुरुवात झाली होती. नागार्जुन Nagarjuna यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला आणि नाग चैतन्यच्या 'लव्ह स्टोरी' या चित्रपटाच्या यशाबद्दल आयोजित केलेल्या पार्ट्यांनाही समंथा अनुपस्थित होती. समंथा आणि नाग चैतन्य यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी तिचे सासरे आणि नाग चैतन्यचे वडील नागार्जुन हेदेखील प्रयत्न करत होते. मात्र अखेर या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.

समंथाची पोस्ट-

'आमच्या सर्व हिंतचिंतकांना सांगू इच्छितो, बऱ्याच विचारविनिमयांनंतर मी आणि चैतन्यने पती-पत्नी म्हणून आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ असलेल्या आमच्यातील मैत्रीसाठी आम्ही खूप नशिबवान आहोत. ही मैत्री आमच्या दोघांसाठी नेहमीच खास राहील. या कठीण काळात आमची साथ देण्यासाठी आम्ही चाहते, हितचिंतक आणि मीडियाला विनंती करतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी लागणारी प्रायव्हसी आम्हाला देण्याची आम्ही विनंती करतो', अशी पोस्ट समंथा लिहिली असून नाग चैतन्यनेही ती शेअर केली आहे.

samantha naga chaitanya
किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?

"नाग चैतन्यने कधीही त्याच्या पत्नीची फसवणूक केली नाही. याउलट, २०१७ साली लग्न केल्यापासून तो नेहमीच एक प्रेमळ पती म्हणून वागला आहे. वैवाहिक आयुष्यातील कोणत्याही नियमाचं, वचनाचं उल्लंघन त्याने केलं नाही. मजिली या चित्रपटात त्याला ऑनस्क्रीन पत्नीसोबत (समंथा) रागाने वागावं लागलं होतं. असं असतं तरी आपल्या पत्नीसाठी कॅमेरात द्वेषाने पाहणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. आता जेव्हा त्याला समंथासोबत मतभेद दूर करण्यास सांगितलं जातंय, तेव्हा त्याला नक्की कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये," असं नागार्जुन एका मुलाखतीत म्हणाले होते.

६ ऑक्टोबर २०१७ रोजी समंथा आणि नाग चैतन्य विवाहबंधनात अडकले. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच या दोघांची प्रेमकहाणी होती. दोघं पहिल्यांदा जेव्हा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २००९ साली 'ये माया चेसावे' या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी समंथा 'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थला तर नाग चैतन्य हा श्रुती हासनला डेट करत होता. मात्र चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा आणि नाग चैतन्य यांच्यातील जवळीक वाढली. २०१५ मध्ये जेव्हा 'ऑटोनगर सूर्या' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दोघं पुन्हा भेटले, तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये गोव्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या 'बिग फॅट वेडिंग'ची चर्चा संपूर्ण कलाविश्वात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com