छोट्या पडद्यावरील दोन लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. यापैकी एक मालिका ही झी मराठी वाहिनीवरील आहे तर दुसरी स्टार प्रवाह वाहिनीवरील आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकांचे शेवटचे भाग चित्रित करण्यात आले आहेत. झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीये' Ti Parat Aaliye ही मालिका आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी' Jai Bhavani Jai Shivaji ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या दोन्ही मालिकांची जागा आता नवीन मालिका घेणार आहेत.
'जय भवानी जय शिवाजी' ही मालिका अवघ्या १५० भागांतच ही मालिका संपतेय. मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस कसा होता हे सांगताना अभिनेता भूषण प्रधानने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली होती. या मालिकेत भूषणने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मालिका लवकर बंद होण्याबाबत नाराजी व्यक्त केली. आता सचित पाटीलची मुख्य भूमिका असलेली 'अबोली' ही मालिका या मालिकेची जागा घेणार आहे.
दुसरीकडे 'ती परत आलीये' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका लवकरच बंद होणार आहे. ही मालिका फक्त १०० भागांची असेल असं सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसारच या मालिकेचा शेवट होत आहे. त्याठिकाणी 'देवमाणूस २' ही लोकप्रिय मालिका नव्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.