मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे 'भाबीजी घर पर हैं' (Bhabiji Ghar Par Hai). सध्या या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री सोम्या टंडन चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. आता त्यावर तिनं खुलासा केला आहे. तो सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. मात्र त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. त्यावेळी सोम्यानं उत्तर का दिलं नाही असा प्रश्न विचारला आहे. सोम्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, गेल्या पाच वर्षांपासूनचा माझा प्रवास सुंदर होता.
सोम्यानं दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावर तिनं खुलासा केला आहे. त्या मुलाखतीमध्ये सोम्या म्हटली होती की, मला या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले. तो प्रवास फारच सुंदर होता. त्या त्याच्या काही आठवणी माझ्याजवळ आहेत. दरम्यान खूप सारे मित्रही झाले. मला आणखी काही वेगळे प्रोजेक्ट करायचे आहेत. सध्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदलही होत आहेत. त्याचा स्वीकार करुन पुढे जाणे मला महत्वाचे वाटत असल्याची प्रतिक्रिया सोम्यानं दिली होती. मी स्वताला एक वैचारिक अभिनेत्री समजते. मला नेहमी स्वताला स्क्रिनवर पाहायला आवडत नाही.
सोम्यानं भाभीजी घर पर है या मालिकेला अलविदा केला होता. सोम्यानं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना काही गोष्टींचा खुलासा केला आहे. सोम्यानं त्या मालिकेमध्ये अनिता भाभीची भूमिका साकारली होती. अनेकांनी मी हा शो सोडणार म्हणून जे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल लिहिले होते ते वाचून आपल्याला खूप वाईट वाटल्याची खंत सोम्यानं व्य़क्त केली आहे. वास्तविक त्या शो मध्ये अंगुरी भाभीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शिंदे सोबत सोम्याचा वाद झाल्यानं तो शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मला काही बोलण्यास मनाई केली होती. म्हणून मला सविस्तर बोलता आले नसल्याचा खुलासा सोम्यानं केला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.