''मी त्याच्या कानाखाली मारतच गेले पण तो मात्र...''

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी अनेक वर्षांनी मागितली 'या' अभिनेत्याची खुलेआम माफी
Padmini kolhapure
Padmini kolhapureGoogle

वयाच्या सातव्या वर्षापासनं अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे(Padmini Kolhapure) हिंदी सिनेमात काम करतायत. राज कपूर(Raj Kapoor) यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमात त्यांनी झीनत अमानच्या अगदी तरुणपणातली भूमिका साकारली होती. पण तिथेच राज कपूर यांनी त्यांच्यातील अभिनयाचे गुण हेरले आणि आपल्या १९८२ साली आलेल्या 'प्रेमरोग' सिनेमात पद्मिनी कोल्हापुरे यांना सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी निवडलं. या सिनेमात काम करताना पद्मिनी कोल्हापुरे यांचं वय होतं अवघ सतरा वर्षांचं. पण यातला महत्वाचा भाग म्हणजे सिनेमात पद्मिनी यांनी साकारलेलं पात्र ही काहीसं त्याच वयाचं. या सिनेमात पद्मिनी यांनी विधवेची भूमिका साकारली होती.

Padmini kolhapure
सुशांतच्या कुटुंबाकडून अंकिता लोखंडेला मिळालं लग्नाचं 'हे' खास गिफ्ट

या सिनेमात पद्मिनी यांच्यासोबत ऋषी कपूर(Rishi Kapoor) होते. एक श्रीमंत कुटुंबातील विधवा मुलगी आणि एका गरीब ब्राम्हण कुटुंबातला उच्चशिक्षित मुलगा,त्यांच्यातील मैत्री,खुलणारं प्रेम,समाजाची बंधनं असा सारा काही उत्तम मसालेदार ड्रामा 'शोमन' राज कपूर यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने सिनेमात भरला होता. सिनेमातील गाणीही श्रवणीय. 'ये गलिया ये चौबारा,यहॉं आना ना दोबारा' हे गाणं तर आजही इतक्या वर्षांनी लग्नसमारंभात वाजवलं जातं हे विशेष. असो, हे सगळं सांगायचं कारण इतकंच की याच सिनेमामुळे पद्मिनी कोल्हापुरेंवर दिवंगत ऋषी कपूर यांची माफी मागायची पाळी आली.

Padmini Kolhapure And Rishi Kapoor in Prem rog
Padmini Kolhapure And Rishi Kapoor in Prem rogGoogle

'प्रेमरोग' या सिनेमात एक सीन होता की जिथे पद्मिनी कोल्हापुरे यांना ऋषी कपूर यांच्या कानाखाली मारायची होती. पण त्या कानाखाली मारायला घाबरत होत्या. त्या राज कपूर यांना म्हणाल्या,''मी मारायची काय गरज आहे. फक्त मी अॅक्टिंग करते मारल्यासारखी,तुम्ही बाकी सगळं तांत्रिकदृष्टया करून घ्या''. पण शोमन राज कपूर यांना ते पटत नव्हतं. आणि चिंटू म्हणजे ऋषी पण सांगत होते की. ''तू बिनधास्त मार''. शेवटी राज कपूर पद्मिनी कोल्हापुरेंना म्हणाले,''तू जोरात मार,खरंखुरं मार,ज्याचा आवाज यायला हवा''. पण हा सीन कधी लाइट्समुळे,कधी तांत्रिक अडचणीमुळे अशा काही ना काही कारणामुळे परफेक्ट होत नव्हता. त्यामुळे तब्बल आठ वेळा ऋषी कपूर यांच्या कानाखाली मारल्यानंतर तो टेक ओके झाला. आणि चिंटू उर्फ ऋषी कपूर यांचे गाल तेव्हा लाल-लाल झाले होते. आज अनेक वर्षांनी एका मुलाखती दरम्यान पद्मिनी कोल्हापुरे यांनी हा किस्सा सांगितला. आणि लगेचच दिवंगत ऋषी कपूर यांची माफीही मागितली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com