लॉकडाऊनचे उल्लंघन औरंगाबादेत आतापर्यंत २०३ जणांवर गुन्हे  

File Photo
File Photo

औरंगाबाद ः शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे; मात्र लॉकडाऊनचे आदेश सर्रास मोडले जात आहेत. अशांवर कठोर कारवाई केली जात असून, २०३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी (ता. ३१) लॉकडाऊन व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ४५ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 

विनाकारण फिरणाऱ्यांसह जाधववाडी येथे सुरक्षित अंतर न बाळगता पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती गोळा करून जमावबंदीचे उल्लंघन केले आणि आरोग्याची काळजी न घेतल्याने सहा भाजीविक्रेते व घाऊक विक्रेत्यावरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊन असतानाही दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चहा टपरीचालक, चायनीज विक्रेता, इलेक्ट्रिक रिपेरिंग दुकानदार, हॉटेलचालक, पंक्चर दुकानदार, झेरॉक्स दुकानदार आणि एका टेलरचा गुन्हा नोंद झालेल्यात समावेश आहे. रविवारी (ता.३०) ४४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शनिवारी (ता. २९) ५२ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. 

लॉकडाऊनमध्ये फिरण्यास मज्जाव आहे; पण जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. विनाकारण फिरणाऱ्या २०३ जणांविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. गल्लीबोळात फिरणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करीत आहोत. यापुढे विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. गस्त वाढविण्यात आली आहे. घरातून बाहेर जाऊ नका घरात बसूनच कोरोनाचा सामना आपल्याला करायचा आहे. यापुढे आम्ही अत्यंत कडक पावले उचलीत आहोत. 
- नागनाथ कोडे, सहायक पोलिस आयुक्त. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com