औरंगाबाद : अत्यंत प्रतिकुल अशा कोरोना काळातून आपण जात आहोत. सर्वच यंत्रणा सतर्कता बाळगण्याचे वारंवार इशारा देत असताना आपण मात्र मास्कविनाच व्यवहार करीत आहोत. खाद्य पदार्थ निर्मितीपासून ते लोकांना देण्यापर्यंत कोणतीही सुरक्षा बाळगली जात नसून उघड्यावर पदार्थ ठेवून तेच ग्राहकांना वितरीत केले जात आहेत. कुणीच मास्क वापरत नसल्याने कोवीड काळातच सुरक्षेला फाटा बसत असून अशाने संसर्गाच्या लाटा पुन्हा उसळण्याचीही शक्यता आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अन्नावाचून अनेकांचे जीव गेले. आर्थिक संकटे आली. दैनंदिनी थांबली. नोकऱ्या गेल्या. याची झळ अजूनही सोसतोच आहे. अशा भीषण संकटापेक्षा आणखी कोणते संकट भयावह असेल परंतू यातूनही आपण बोध घेत नसल्याचे बऱ्याच माणसांच्या वर्तनावरुन दिसून येत आहे. मास्क घालणे, सुरक्षित अंतर राखून व्यवहार करणे व वेळोवेळी निर्जंतूकीकरण करणे या गोष्टींना आपण फाटा देत आहोत. ही धोक्याची घंटा ठरू शकते.
सजग व्हा
ही अमलबजावणी हवी
(संपादन-प्रताप अवचार)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.