लॉकडाउनमध्ये तारे जमीन पर... 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः ‘‘मी जर पंतप्रधान झाले तर सर्व शाळांना सुटी जाहीर करेल. पप्पांच्या ऑफिसलाही सुटी द्यायला लावेल. आईला सांगेन तू आराम कर; कारण मी पंतप्रधान आहे. घरी राहून भाऊ-बहिणीसोबत खूप मज्जा करेल. आजी-आजोबांशी गप्पा मारेल. सर्व कुटुंब एकत्र राहू...’’ एका सातवीच्या विद्यार्थिनीने हा निबंध लिहिला होता. 

इतर विद्यार्थ्यांनीही ठरलेल्या पद्धतीने पुस्तकांचा आधार घेऊन निबंध लिहिला होता, मात्र ढोबळ मनाने तिने लिहिलेला निबंध मनाला त्यावेळी खूप भावला होता. आज कोरोना लॉकडाउनच्या निमित्ताने तिची कल्पना खरी ठरली असल्याचे मराठा शाळेचे शिक्षक रूपेश मोरे यांनी सांगितले. शाळेत मुले औपचारिक शिक्षण घेतात. मात्र, शिक्षणातील स्पर्धा, पालकांच्या मुलांकडूनच्या अपेक्षा या सर्वात मुलांचे अनौपचारिक शिक्षण राहून जाते. मुलांना आपल्या आई-बाबांसोबत घरात वेळ घालवून उगीचच गप्पा मारायच्या असतात. पण, यासाठी ना मुलांकडे, ना पालकांकडे वेळ असतो. 

बाळ जेवलास का? आज शाळेत काय शिकवले? होमवर्क केला का? डबा खाल्लास का? क्लासला गेला होता का?अशा आठ-दहा प्रश्‍नांमध्ये तोच तोपणा व एक कृत्रिमता आलेली आहे. आता लॉकडाउनमध्ये कुटुंब हेच अनौपचारिक शिक्षणाचे केंद्र बनले आहे. मुलांना आई-वडिलांसोबत पूर्णवेळ घालवायला मिळत आहे. या काळात मुले घरात, शेतात आई-वडील, आजोबांना मदत करताना दिसत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जंक फूड्स, कोल्ड्रिंक्स गायब 
लॉकडाउनच्या काळात सर्व दुकाने, हॉटेल्स बंद असल्यामुळे कोल्ड्रिंक्स, फास्ट फूडसाठी हट्ट करणारी मुले घरातील भाजी-पोळी आवडीने खात आहेत. यापूर्वीही मुलांना उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्या असायच्या पण त्यातही समर कॅम्प, छंदवर्ग, क्लास, शाळेचा होमवर्क, निकालाचे दडपण, नातलगांची लग्नकार्ये, ठरलेल्या पद्धतीने पर्यटन यामुळे फक्त नावाला सुट्या होत्या. मात्र, लॉकडाउनमुळे रविवारच्या सुटीचा आनंद नाही; सोमवारच्या शाळेचे दुःखही नाही. ज्यात फक्त आई-वडील, मुले आणि आजी-आजोबा हेच आहेत. लॉकडाउन संपवून मुले जेव्हा शाळेत येतील; तेव्हा अधिक समंजस झालेली असतील, असे मतही श्री. मोरे यांनी व्यक्त केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ऑनलाइनचा दिखावा 
मुलांच्या शाळेचे फक्त वीस दिवस बुडाले आहेत. त्यातील दहा दिवस परीक्षांचे असतात. असे असताना गुणवत्ता, दर्जेदार शिक्षणाचा टेंभा मिरविणाऱ्या काही शाळा राहिलेली फीस पालकांकडून वसूल व्हावी. शाळेत नव्याने जास्त ॲडमिशन मिळावेत हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह धरत आहेत. भविष्यात ऑनलाइन शिक्षण पद्धत होणार. नक्की होणार; पण ती ही वेळ नाही. ऑनलाइन शिक्षणाचा कळवळा या आणीबाणीच्या काळात तूर्त थांबवायला हवा. मुलांना त्यांच्या सक्तीच्या सुटीचा आनंद घेऊद्या, असे रूपेश मोरे यांनी सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com