औरंगाबादच्या नामांतरावरून सेना-भाजप समोरासमोर,विमानतळाचा मुद्दा गाजणार!

विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाच्या टेबलावर धूळ खात असल्याची टीका शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.
BJP And Shiv Sena Politics In Aurangabad
BJP And Shiv Sena Politics In Aurangabadesakal

औरंगाबाद : आमच्यासाठी 'संभाजीनगर' ही घोषणा झाली तेव्हा अर्थात मे १९८८ मध्येच झाले आहे. मात्र संभाजीनगर विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाच्या टेबलावर धूळ खातो आहे. त्यासाठी भाजप नेत्यांनी जाऊन जोर लावावा. कळेल किती प्रेम तुम्हाला या शहराविषयी!, असे प्रयुत्तर शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. नुकतेच फडणवीस यांनी शिवसेनेवर औरंगाबाद (Aurangabad) व उस्मानाबाद (Osmanabad) या शहरांचे नामांतर करता न आल्याची टीका केली होती.(Shiv Sena And BJP Attack Eachother Over Renaming Of Aurangabad)

BJP And Shiv Sena Politics In Aurangabad
पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात जाणार; देवेंद्र फडणवीस

ना औरंगाबादचे- संभाजीनगर, ना उस्मानाबादचे- धाराशीव. साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात, अशी टीकास्त्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली होती. आता तर शिवसैनिकांनाही माहिती आहे की, ते तेच ते बोलणार आहेत. हिंदूत्त्व जगावं लागतं, ते भाषणापुरते मर्यादित नसते. सोयीचा इतिहास आणि ‘सिलेक्टिव्ह’विसर! हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवित आहात का?, असा सवाल फडणवीस यांनी शिवसेनेला केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com