CoronaVirus : रेल्वे अपघात : चार्टर विमानांने मध्यप्रदेशातून टीम निघाली 

photo
photo

औरंगाबाद : करमाड जवळील रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांच्या चौकशी साठी व इतर मदत कार्यासाठी मध्यप्रदेशचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक टीम औरंगाबादेत दुपारी विशेष चार्टर विमानाने दाखल होत आहे. अशी माहिती चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातर्फे देण्यात आली. 

मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील हे मजूर चंदनझिरा, जालना औद्योगीक वसाहतीतील एका स्टील कंपनीत कामाला होते. वीस मजुर जण गुरुवारी (ता. सात) संध्याकाळी सात वाजता जालण्याहून निघाले होते. ते सटाणा शिवारात रेल्वे रूळावर झोपले होते. पहाटे सव्वापाच वाजता एका रेल्वे मालगाडीने त्यांना चिरडले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या दुर्घटनेत यात १६ जणांचा जागीच चिरडले तर दोन जण जखमी झाले. या घटनेत मृत्यू पावलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली. यासह जखमींवर उपचाराची व्यवस्थाही मध्यप्रदेश सरकार करणार असल्याचेही चौहान यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मध्य प्रदेश सरकारची उच्च अधिकाऱ्यां‍ची एक टीम विशेष विमानाने औरंगाबादकडे निघाली आहे. या  टीम मध्ये मंत्री मीना सिंग, आय सी पी केसरी सिंग, आयपीएस राजेश चावला आणि आणि अधिकारी यांचा समावेश असणार आहे. ही टीम या घटनेत मृत्यू पावलेल्यावर अंत्यसंस्कार करेल. तसेच जखमीना लागणारी मदत करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com