मराठवाड्याच्या पाण्यासाठी तेव्हा पंकजा मुंडे यांनी काय केले ः रमेश गायकवाड

aurangabad news
aurangabad news

औरंगाबाद- तत्कालीन भाजप सरकारने नगर-नाशिकला झुकते माप देत चुकीचा जल आराखडा तयार करून घेतला व मराठवाड्याचे हक्काचे पाणी पळविले. त्र्यंबकेश्वर ते पैठणदरम्यानच्या जलाशयात 156 टीएमसी उपलब्ध पाणी असताना, ते 205 टीएमसी दाखवले. त्यामुळे चुकीच्या आराखड्याविरोधात व मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारला जाणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी सोमवारी (ता. 27) सांगितले. तेव्हा पंकजा मुंडे यांनी काय केले असा प्रश्‍न त्यांनी यावेळी केले. 

पत्रकार परिषदेत गायकवाड पुढे म्हणाले, की 2012 मध्ये तत्कालीन राज्य शासनाने गोदावरी खोरे एकात्मिक जलविकास आराखडा तयार करण्यासाठी पाऊल उचलले. मात्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नगर-नाशिकच्या नेत्यांच्या दबावामुळे चुकीचा जलविकास आराखडा तयार केला. त्र्यंबकेश्वर ते पैठणदरम्यानच्या जलाशयात 156 टीएमसी उपलब्ध पाणी असताना, ते 205 टीएमसी दाखवले. हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे असताना, 50 टीएमसी पाण्यावर बांधलेली धरणे प्रमाणित करून घेतली.

मुळा व प्रवरा हे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात असताना, हे खोरे व त्यातील पाणी वेगळे दाखवले. त्याचा नकाशा वेगळा तयार करून घेतला. त्र्यंबकेश्वर ते पैठण यादरम्यानच्या जलाशयात मराठवाड्याच्या हक्काचे 102 टीएमसी पाणी तर नगर-नाशिकचे 115 टीएमसी पाणी ऊर्ध्व गोदावरीत आहे. असे असताना नगर-नाशिक भागात मराठवाड्याच्या हक्काचे 50 टीएमसी पाणी पळवून 165 टीएमसीची धरणे बांधली गेली. दमणगंगा, नारपार, पिंजार प्रकल्पातील 57 टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचे आश्वासन हे मृगजळ आहे, असा आरोप त्यांनी केला. चुकीचा जलआराखडा रद्द करून नव्याने नियोजन करावे, अशी मागणी करीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. 

माजलगाव धरणाचे केले पाणी कमी 
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 22 जून 2018 रोजी जल आराखडा सादर करण्यात आला होता. पंकजा मुंडे, तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर हे जल परिषदेचे सदस्य होते. मात्र मराठवाड्यातील एकही मंत्री उपस्थित नव्हता. 12 सप्टेंबर 2018 ला जायकवाडीच्या पाण्याचे फेरनियोजन केले. फेरनियोजनाच्या नावाखाली माजलगाव धरणाचे पाणी कमी केले, त्यावेळी पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी काय केले? असा प्रश्नही गायकवाड यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com