दवाखाना न उघडल्यास लायसन्स रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा डॉक्टरांना इशारा 

Latur News
Latur News

लातूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या भीतीने जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने (खासगी रूग्णालय) बंद केले आहेत. अनेक मोठ्या रूग्णालयात बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) बंद करण्यात आली आहे. यामुळे सामान्य रूग्णांची ससेहोलपट सुरू झाली.

जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालय सुरू करण्याचे आदेश देऊनही डॉक्टरांनी आदेश जुमानले नाहीत. यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शनिवारी (ता. २८) सर्व डॉक्टरांना दवाखाने सुरू करण्याचे आदेश दिले आहे. दवाखाने न उघडल्यास डॉक्टरांची नोंदणी रद्द (लायसन्स) करण्यासोबत आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून त्यातून अत्यावश्यक सेवेतील रूग्णालये व औषधी दुकानांना सुट देण्यात आली आहे. सुट देऊनही अनेक ठिकाणी डॉक्टरांनी खासगी रूग्णालयांनी कुलूप घातले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पुणे व मुंबई येथून जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक आल्याने कोरोनाबाधित रूग्णांचा संपर्क येईल, या भीतीने डॉक्टरांनी दवाखाने बंद केली आहेत. यातून खासगी रूग्णालयांनी ओपीडी बंद झाली. याचा परिणाम लहानसहान आजारांच्या रूग्णांची सरकारी रूग्णालयांत गर्दी वाढण्यावर झाला. 

सरकारी रूग्णालयांनी कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांना प्राधान्य देऊन विलगीकरण कक्ष सुरू करून संशयित व्यक्तींची तपासणी सुरू केली आहे. हे काम असताना साध्या आजाराचे रूग्ण मोठ्या संख्येने येऊ लागल्याने सरकारी रूग्णालयातील व्यवस्था कोलमडून गेली. दवाखाने बंद झाल्यामुळे विविध आजाराच्या रूग्णांची चांगलीच गोची झाली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वाहतूक बंद असल्याने शहराच्या ठिकाणी उपचाराला जाण्यासाठीही त्यांची अडचण झाली. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत मोठ्या संख्येने तक्रारी गेल्या. यामुळे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी २३ मार्च रोजीच सर्व डॉक्टरांना दवाखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, त्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले व सामान्य नागरिकांप्रमाणे घराबाहेर न पडणे पसंत केले. याची गंभीर दखल श्रीकांत यांनी घेतली. यातूनच त्यांनी शनिवारी सर्व डॉक्टरांनी त्यांच्या रूग्णालयात बाह्यरूग्ण सेवा व चोवीस तास अत्यावश्यक सेवा सुरू ठेऊन रूग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्यास त्यांनी डॉक्टरांना बजावले आहे. बाह्यरूग्ण सेवा व चोवीस तास अत्यावश्यक सेवा रूग्णांना न मिळाल्यास संबंधित डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यासोबत त्यांच्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा त्यांनी आदेशात दिला आहे.    

भाजीपाला दुपारी दोनपर्यंतच

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आवर घालणे आवश्यक आहे. भाजीपाला व फळे खरेदीसाठी नागरिक दिवसभर बाहेर येत असून यानिमित्ताने त्यांचा घराबाहेरील वावर वाढला आहे. यामुळे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी भाजीपाला व फळे विक्रीसाठी कालावधी निश्चित केला असून आता दुपारी दोनपर्यंत भाजीपाला व फळांची विक्री करता येणार आहे. तसे आदेश त्यांनी शनिवारी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com