अतिवृष्टीने नुकसान; औसा तालूक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकरी आत्महत्या औसा.jpg
शेतकरी आत्महत्या औसा.jpg

औसा (लातूर) : कर्जबारी आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतातील सर्व पीक गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील आंदोरा गावात गुरुवारी (ता.२२) रोजी घडली आहे. मधूकर श्रीरंग पवार (वय ५०) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना पत्नी, तीन मुली व एक अविवाहित मुलगा आहे.

निवळशेतीवर उदरनिर्वाह चालवत असलेल्या मधुकर पवार यांच्यावर सरकारी व खाजगी मिळून दोन लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. हे कर्ज खरिप पिकांवर परतफेड करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र १२ ते १५ अक्टोबर आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाने खरिपातील सर्वच पिके हातची गेली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, पुढील उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत ते होते. गुरुवारी (ता.२२) रोजी ते सकाळी लवकर नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते.

मात्र कर्जाची धास्ती घेतलेल्या श्री. पवार यांनी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास स्वता:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती महादेव काशीनाथ शेळके यांनी भादा पोलिसांना दिली असता पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा दुजोरा तहसील कार्यालयानेही दिला आहे. गेल्या कांही वर्षापासून शेतकरी आत्महत्येचं शुक्लकाष्ट औसा तालुक्यातून बाजूला होत नसल्याचे दिसत आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com