स्टॅम्पसाठी शेतकरी, विद्यार्थ्यांची का होतेय अडवणूक ! वाचा सविस्तर

मुद्रांक.jpg
मुद्रांक.jpg

कळंब : मुद्रांकासाठी (स्टॅम्प पेपर) शेतकरी व विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुद्रांक विक्रेत्यांनी ग्राहकाला पावती देणं बंधनकारक करण्यात आले आहे. पावतीबुक छापून मिळेपर्यत विक्रेत्यांनी मागच्या चार दिवसांपासून मुद्रांक देणं बंद केले आहे. स्टॅम्प पेपर आहे पण पावती नसल्यामुळे देता येत नाही. त्यामुळे नागरिकाची सरळसरळ अडवणूक केली जात असल्याचा प्रकार आहे. 

मुद्रांक विक्री करताना प्रति मुद्रांकामागे आगाऊ रक्कम उखळली जात असल्याच्या प्रकारामुळे उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी पावती शिवाय मुद्रांकाची ग्राहकाला विक्री करू नये, अशा सूचना दुय्यम निबंधक (रजिष्ट्री) अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांक विक्री थांबविल्याचे समजते. पीक कर्ज, शैक्षणिक कामकाज, हक्कसोड, जमीन, प्लॉट नोटरी करणे आदी कामासाठी मुद्रांकाची आवश्यकता आहे. शैक्षणिक वर्षे सुरू झाल्याने विद्यार्थी स्टॅम्प खरेदीसाठी तहसील कार्यलयाच्या आवारात चकरा मारत आहेत. स्टॅम्प आहे पण पावती छापून मिळत नसल्याने देता येत नसल्याचे स्टॅंप विक्रेत्यांनी सांगितले.

प्रशासनाच्या सूचनेला चॅलेंज
पन्नास, शंभर, पाचशे रुपयांच्या प्रति स्टॅंप मागे आगाऊ रक्कम उखळली जात असल्याची बाब उपविभागीय अधिकारी श्रीमती गाठाळ यांच्या निदर्शनास काही नागरिकांनी आणून दिल्यानंतर पावती शिवाय स्टॅंप विक्री करू नये आशा सूचना देण्यात आल्या. मागच्या चार दिवसांपासून एकही स्टॅम्प विक्रेत्यांनी पावती बुक छापून घेण्याचा मुहूर्त साधलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनेला विक्रेत्यांनी स्टॅप विक्री थांबून चॅलेंज केल्याचा प्रकार आहे.

ग्राहकाला पावती दिल्याशिवाय मुद्रांक विक्री नाही
मागच्या आठ दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी ग्राहकाला स्टॅम्‍प देतेवेळी पावती देणे बंधनकारक केल्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे स्टॅप विक्रेत्यांना तसा सूचना देण्यात आल्या असून पावतीबुक छापून मिळत नसल्याचे विक्रेते सांगत आहे. असे दुय्यम निबंधक ( रजिष्ट्री) अधिकारी व्यंकट माडे यांनी सांगितले.

चार दिवस झाले चकरा मारतोय
पीक कर्जासाठी शंभर रुपयांच्या स्टॅंम्पची आवश्यकता आहे. मुद्रांक विक्रेत्यांना स्टॅम्पची मागणी केल्यास पावतीबुक छापलेले नाही. त्यामुळे देता येणार नाही. पावती विना स्टॅम्प दिल्यास आमचा परवाना निलंबित होईल असे सांगून परत पाठविले जात असून चार दिवस झाले चकरा मारतोय असे शेतकरी सांगत आहेत.

संपादक- प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com