लातूर : सातत्याने अडचणीत असलेल्या शेतकऱयांचा खत बियाणे वाहतुकीचा खर्च टाळता यावा या करीता कृषी विभागाच्या वतीने बांधावर खत बियाणे पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आतापर्यंत जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱय़ांच्या बांधावर ३१ हजार चारशे मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच सुमारे तीन हजार क्विंटल बियाणे देखील बांधावर देण्यात आले आहे. यातून शेतकऱयांच्या पैशाचीही बचत झाली आहे.
दोन हजार गट कार्यरत
जिल्ह्यात शेतकऱयांच्या बांधावर खत आणि बियाणांचा पुरवण्य़ासाठी शेतकरयाचे गट आवश्यक असतात. जिल्ह्यात असे दोन हजार ४८ गट या खरीप हंगामात कार्यरत झाले. शेतकऱयांची मागणी नोंदवून घेवून या गटांनी त्यांच्या बांधावर जावून खत आणि बियाणांचा पुरवठा केला आहे. सर्वाधिक गट अहमदपूर तालुक्यात २९६, निलंगा २९२, लातूर २७५, उदगीर २६७ तर चाकूर तालुक्यात २४१ गटांचा समावेश आहे.
चाकूरच्या शेतकऱयांचा पुढाकार
जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ४०५ मेट्रीक टन खताचा पुरवठा शेतकऱय़ांच्या बांधावर नेवून देण्यात आला आहे. यात सर्वाधिक खत चाकूर तालुक्यात १७ हजार ८३२ मेट्रीक टन खताचा पुरवठा केला गेला आहे. निलंगा तालुक्यात तीन हजार ४५३, अहमदूपर तालुक्यात दोन हजार ८६७, उदगीरमध्ये एक हजार ४५९, औसा एक हजार २६८ तर लातूर तालुक्यात एक हजार पाच मेट्रीक टन खत देण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात चालू खऱीप हंगामात शेतकऱयांना बांधावर पुरवठा करण्यात आलेले खत आणि बियाणांची तालुकानिहाय माहिती :
या योजनेमुळे पहिल्यांदा कोरोनाच्या संकटापासून शेतकरी दूर राहिला. बाजारपेठेत गर्दी झाली नाही. पूर्व नियोजन केल्याने ऐनवेळेस होणारी धावपळही थांबली. इतकेच नव्हे तर खत, बियाणे खरेदीसाठी चर्चेला वेळ मिळाल्याने काही प्रमाणात ते स्वस्तही पडले. यातून शेतकऱयांच्या पैशाची बचत झाली.
दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.