'येळकोट-येळकोट, जय मल्हार' च्या घोषणांनी जालना महामार्ग निनादला  

jalna dhangar aandolan.jpg
jalna dhangar aandolan.jpg

बदनापूर (जालना) : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने जालना येथील खासदार रावसाहेब दानवे यांचे निवासस्थान ते औरंगाबाद येथील रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या निवासस्थानपर्यंत जागोजागी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. बदनापूर तालुक्यात सात फाट्यांवर मानवी साखळी उभी करण्यात आली होती. यावेळी 'येळकोट येळकोट, जय मल्हार' व 'आरक्षण आमच्या हक्काचे' अशा जोरदार घोषणा देत महामार्ग दणाणून सोडला.


तालुक्यातील खादगाव, शेलगाव, धोपटेश्वर पाटी, बदनापूर बसथांबा परिसर, तहसिल कार्यालय, सोमठाणा व वरुडी पाटीवर 'मी धनगर' अशा टोप्या घालून व हातात मागण्यांचे फलक घेऊन जय मल्हार सेना व धनगर बांधवांच्या वतीने मानवी साखळी उभी करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भौतिक अंतर प्रणालीचे पालन करीत मागण्यांच्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. धनगर आरक्षण कृती समितीचे मुख्य समन्वयक लहुजी शेवाळे, विठ्ठलराव रबदडे, कैलास चोरमारे, विठ्ठल रंधवन, पांडुरंग कोल्हे, धनराज सातपुते, सोपान भांड, जनार्धन सोरमारे, कृष्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना व चंदनझीरा येथे दिपक बोराडे, गणेश जारे, ऍड. अशोक तारडे, हरिश्चंद्र शेळके, विठ्ठल तोतरे व बाबासाहेब इंगळे यांनी तर बदनापूर तालुक्यात जय मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज सातपुते, तालुकाध्यक्ष सोपान भांड, गोविंद जाधव, रघुनाथ होळकर, मच्छिंद्र होळकर, रामनाथ जाधव, कृष्णा खरात, रमेश चोरमारे, बजरंग वैद्य, कैलास बकाल, सुनील गायके, भरत भोजने, विठ्ठल दिवटे, रामणारायन कोल्हे, प्रभाकर जोशी, हनुमान तारडे, बळीराम वैद्य, नारायण वैद्य व आप्पासाहेब शेळके, गणेश कोल्हे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 

दरम्यान, जय मल्हार सेनेच्या वतीने बदनापूर येथे तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. त्यात शासनाने भारतीय राज्य घटनेने धनगर समाजाला दिलेल्या घटनादत्त अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात. या प्रमुख मागणीसाठी जालना-औरंगाबाद दरम्यान मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. तर त्याचवेळी राज्यातील इतर जिल्ह्यात अर्धजलसमाधी आंदोलन करीत आहेत. मात्र शासनाने धनगर समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात तातडीने पाऊले उचलली नाहीत तर धनगर समाज येत्या डिसेंबर महिन्यात यापेक्षाही आक्रमक आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर राजू कोल्हे, बालाजी ओळेकर, एकनाथ कानुले, बालाजी कानुले, विठ्ठल चांगुळपाये, गणेश चाळगे, गणेश राइंदे, दिपक कानुले, बाबासाहेब माने, बंडू सोरमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

राज्यातील धनगर समाजाला घटनेत अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आल्या आहेत. मात्र 'र' चा 'ड' असा उल्लेख झाल्याने समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
 बजरंग वैद्य, जेष्ठ नागरिक, बदनापूर

धनगर समाजाला मागील 65 वर्षांपासून जाणीवपूर्वक अनुसूचित जमातीच्या सवलती पासून वंचित ठेवण्यात आले आहे. मात्र यापुढे धनगर समाजाला हक्क मिळावा यासाठी आमची तीव्र संघर्ष करण्याची तयारी आहे.
 धनराज सातपुते, जिल्हाध्यक्ष : जय मल्हार सेना

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com