खून प्रकरणी तिघांना जन्मठेप 

court news.jpg
court news.jpg

उस्मानाबाद : चारचाकी वाहन अडवून तलवारीने खून केल्याप्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. उत्पात यांनी मंगळवारी (ता. २९) हा निकाल दिला. 


याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता के. डी. कोळपे यांनी सांगितले की, देवंग्रा (ता. भूम) येथील अमोल बापूराव टकले यांच्या पूर्वीच्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. अमोल हे चारचाकी वाहनाने प्रवास करीत होते. त्यांचे वाहन १० जणांनी अडवून तलवारीने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर, खांद्यावर वार केले. त्यामुळे अमोल जागेवर मरण पावले. मृताचे वडील बापूराव पंढरी टकले यांनी १७ सप्टेंबर २०१४ ला दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यामुळे सावरगाव परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिस निरीक्षक एच. बी. वाकडे यांनी याबाबतचा तपास केला. यामध्ये भक्कम पुरावे हाती लागले. त्यामुळे पोलिस निरीक्षक वाकडे यांनी पाच डिसेंबर २०१४ ला न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सरकारी पक्षाकडून एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता यांचा युक्तिवाद, परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शींची साक्ष यावरून न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, १० हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com