सावधान ८० देशातील १२ कोटी लोकांना या रोगाची लागण

File Photo
File Photo

नांदेड : आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणातून देशाला ‘पोलिओमुक्त’ करण्यात पूर्णपणे यश आले आहे. परंतू, पोलिओ प्रमाणाचे अनेक गंभीर व दूर्धर आजार आहेत. ज्या आजाराचे आजही समुळ उच्चाटन झाले नाही. अशा गंभीर व दूर्धर आजारांचा फौलाव होऊ नये, म्हणून राज्य आरोग्य विभागाने औषधोपचाराच्या मदतिने असाध्य आजारावर उपचार करुन त्या आजाराचे समुळ उच्चाटन करण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू केले आहेत. तरी ही अनेक आजार पूर्णपणे आटोक्यात आले नाहीत. ‘हत्तीरोग’ हा यातीलच एक आजार आहे. 

सामुदायिक औषधोपचार मोहीम
नांदेड जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने शहरी व ग्रामिण भागात ‘हत्तीरोग’ एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम दोन ते सात मार्च या कालावधीत ग्रामीण भागात तर शहरी, महापालिकेच्या निवडक भागात दोन ते १२ मार्च दरम्यान राबविली जाणार आहे. या दरम्यान ७७ लाख डि.ई.सी. गोळ्या व ३१ लाख अलबेंडॉझॉल गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत पोहचती करण्यात आल्या आहेत.

राज्यात इथे आढळतात सर्वाधिक हत्तीरोग रुग्ण-
नांदेड, नागपूर, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात ‘हत्तीरोगा’चे रुग्ण मोठ्या जास्त प्रमाणात आढळुन येतात.

दोन वर्षाची बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळले 
जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यासाठी एक हजार ८९५ टिम ( दोन कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आली आहे. यावर ३७८ पर्यवेक्षक, २० जिल्हास्तरीय अधिकारी व २० जिल्हास्तरीय पर्यवेक्षक पाहणी करणार आहेत. जिल्ह्यात ३५ लाख ७९ हजार २४ लोकसंख्येपैकी ३१ लाख चार हजार ३३४ लोकसंख्या निवडलेली आहे. यात एकुण अपेक्षित लाभार्थी २८,८७,३७ आहेत. यात शून्य ते दोन वर्षाची बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. लोकसंख्येत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड मधील हडको, सिडको  वाघाळा व तरोडा खु व तरोडा बु परिसराचा समावेश आहे.

अशी होते हत्तीरोगाची लागण
बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजिवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते, तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतूची १२ ते १४ दिवसात वाढ होऊन पुनः दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा, हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात. त्यांना आपण मायक्रोपफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात पाच ते आठ वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. 

केंद्र शासनाचे २०२१ पर्यन्त रोग उच्चाटणाचे लक्ष
हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकाग्रृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुध्दा वाजते. काही पुरुषांमध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाहय जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृध्दी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने २०२१ पर्यन्त उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी ‘एकदिवसीय सामुहिक औषधोपचार’ एम.डी.ए. (मास ड्रग अॅडमिनिट्रेशन) सर्वांना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसोत) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.

असे जळतात हत्तीरोगाचे जंतु 
या एम.डी.ए. एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहीम ही जवळ-जवळ १२ दिवसांच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचाराइतकीच प्रभावी आहे. ‘हत्तीरोग’ रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपुर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास १२ दिवस औषधोपचार करणे. शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम १० ते १५ वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम.डी.ए या एकदिवसीय डी.ई.सी अधिक ॲलबेनडॉझॉल गोळयाचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा (डोस) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ जवळ ९५ टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

 

हत्तीरोग निर्मुलनासाठी सर्वांनी हातभार लावावा
डीईसी अधिक ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेवक येतील तेंव्हा या गोळ्या उपाशी पोटी न घेता जेवन करून घ्याव्यात. ‘शासना’च्या या मोहीमेस नागरिकांनी प्रतिसाद द्यावा व हत्तीरोग निर्मुलनासाठी सर्वांनी हातभार लावावा. 
- डॉ. आकाश देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com