India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Mumbai ATS Probe : अंबरनाथच्या मलंगगड परिसरातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पासपोर्ट बाळगल्याच्या आरोपावरून चांद अली अब्दुल रशीद सैयद याला हिललाईन पोलिसांनी अटक केली. २००९ मध्ये भारतीय पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर पाकिस्तानात गेल्याचा आरोप आहे.
 Mumbai ATS Probe

Mumbai ATS Probe

esakal

Updated on

संजय गडदे

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पासपोर्ट बाळगल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात उघडकीस आला आहे. चांद अली अब्दुल रशीद सैयद (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला मलंगगड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस करत असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई एटीएसनेही (ATS) स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com