

BMC
Esakal
मुंबई : विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे मुंबई शहराचा अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. भविष्यात अशा तांत्रिक कारणांमुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने मुंबईचा तब्बल ८० टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पात अतिरिक्त ११० के.व्ही. नवीन पॉवर रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पर्यायी व्यवस्थेमुळे मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे शक्य होणार आहे, यासाठी पालिका १४ कोटी ६७ लाख रुपये खर्च करणार आहे.