

BMC
Esakal
मुंबई : निवडणूक काळात आणि निवडणुकीच्या आधी अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्या जातात; मात्र निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून दिले जाते. निवडणुकीनंतर बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात झालेली दिसतात. बेकायदा बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळत असून अधिकाऱ्यांमुळे बेकायदा बांधकामावर कारवाई होणार असल्याची माहिती उघड होते, ती माहिती अधिकारीच बाहेर फोडतात, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.