काय सांगता! लॉकडाऊन असतानाही मुंबईत रोज किमान एक अपघात

mumbai accident
mumbai accident

मुंबई : कोरोनाचे महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. त्याचबरोबर एप्रिलमध्ये राज्यात झालेल्या अपघातातील सर्वाधिक अपघातही मुंबईत झाले आहेत. मुंबईत एप्रिलमध्ये किमान रोज एक अपघात झाला आणि त्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

लॉकडाउनमुळे केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतरही मुंबईत एप्रिलमध्ये 40 अपघात झाले. त्यात 11 जणांचे निधन झाले आणि 35 जण जखमी झाले. गतवर्षी एप्रिलमध्ये 250 अपघात झाले होते आणि त्यात जणांचा बळी गेला होता. अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी अवजड वहाने रस्त्यावर आली आहेत. केवळ नितांत गरज असेल त्याचवेळी वैयक्तिक वाहनांना परवानगी दिली जात आहे. त्यानंतरही हे अपघात झाले आहेत. या अपघातात निधन झालेल्यात स्थलांतरितही आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

राज्यात महामार्गावर झालेले अपघात अवजड वाहनांचे आहेत, तर शहरातील अपघात हे चारचाकी वाहनांचे आहेत. त्यातही अनेकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन केलले नाही. गतवर्षी राज्यात एकंदर 2 हजार 760 अपघात झाले होते, त्यात 1 हजार 120 जणांचे निधन झाले होते. तर या वर्षी 576 अपघातात राज्यातील एकंदर 300 जणांनी जीव गमावला आहे.

Despite the lockdown, at least one accident a day in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com