

Rajdhani Express Fire Incident: Quick Response Saves 68 Passengers Near Ratlam
esakal
मुंबई : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात रविवारी पहाटे थिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्याला आग लागल्याने मुंबई-दिल्ली या अतिव्यस्त रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे बाधित डब्यातील सर्व ६८ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.