हे सरकार मूर्ख, कसलाही विचार करत नाही!

हे सरकार मूर्ख, कसलाही विचार करत नाही!

मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्यांना लोक फॅसिस्टवादी म्हणतात; मात्र त्यांना फॅसिस्टवाद समजून घेण्याची समज तरी आहे का, असा प्रश्‍न ‘कलम ३७०’ रद्द केल्यावर राजीनामा देणारे आयएएस अधिकारी कन्नन गोपिनाथन यांनी उपास्थित केला आहे. हे सरकार मूर्ख असून कोणत्याही परिणामांचा विचार न करता लोकांवर निर्णय लादत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीमध्ये लोकांनी सरकारला प्रश्‍न विचारायला हवेत. इथे मात्र सरकारच लोकांना प्रश्‍न विचारत असल्याने त्याविरोधात जनआंदोलन उभारून सरकारला उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दादरच्या श्रमिक कार्यालयात ‘फ्रेंड्‌स ऑफ डेमोक्रॅसी’तर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी कन्नन बोलत होते. ते म्हणाले, हे सरकार फॅसिस्टवादी असल्याचे म्हटले जाते, पण मला हे सरकार मूर्ख असल्याचे वाटते. सरकारला मुस्लिमांचा द्वेष आहे, मग नोटबंदीवेळी त्यांना कोणाचा राग होता, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

नोटबंदीवेळी सरकारने बॅंकांसमोर रांगा लावायला लावल्या. आता ‘एनआरसी’साठी रांगा लावायला लावणार आहेत. आमचेच लाखो, करोडो रुपये खर्च करून आम्हालाच नागरिकत्व दिले जाईल, हा कुठला प्रकार आहे असा प्रश्‍न विचारत बेघर, आदिवासी, गरिबांना याचा त्रास होणार आहे. हा कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असे कन्नन यांनी सांगितले.

...म्हणून राजीनामा दिला!
कलम ३७० रद्द केले तेव्हाच हा इशारा होता. त्याच वेळी लोक माझ्यासोबत उभे राहिले असते तर आज ही वेळ आलीच नसती. कलम ३७० रद्द झाल्यावर सर्वच गप्प बसले आहेत. सर्वांना गप्प करून दहशत पसरवली आहे. लोकांचे गप्प राहणे हे देशासाठी घातक आहे. यामुळे देशातील लोकशाही धोक्‍यात येऊ शकते. तरीसुद्धा लोक बोलायला तयार नसल्याने मी राजीनामा देऊन याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com