

Diesel Crisis Deepens in Maharashtra; Farmers and Industries Bear the Brunt
sakal
मुंबई: राज्याच्या काही भागांमध्ये तीव्र इंधन टंचाई जाणवू लागली असून याचा मोठा फटका शेतीसह उद्योगक्षेत्राला बसताना दिसतो. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह खानदेशामध्ये अनेक शहरांत आज पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी संघर्षाचे प्रसंगही ओढवले.