'वंदे भारत'मधून भारतात आलेल्या किती जणांना कोरोनाची बाधा?; न्यायालयाची केंद्राला विचारणा

vande bharat.
vande bharat.

मुंबई : लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या विमान प्रवासात मास्क, फेस शील्डचा वापर व सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात येतील, अशी ग्वाही केंद्र सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. वंदे भारत मिशनअंतर्गत विशेष विमानाने भारतात आलेले किती प्रवासी कोरोनाबाधित होते, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकाची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाला दिली. कोरोनाचा फैलाव वाढत असतानाही विमानातील मधले आसन रिक्त न ठेवण्याच्या एअर इंडिया व्यवस्थापनाच्या निर्णयाविरोधात वैमानिक देवेन कनानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

याबाबत मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. प्रवाशांसाठी थ्री-प्लाय मास्क, फेस शील्ड पुरवण्यात येणार आहेत. शक्यतो मधले आसन रिक्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. अधिक प्रवासी असतील तेव्हा मधल्या आसनावर बसणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेसाठी गाऊन दिले जातील, असे नागरी हवाई वाहतूक संचालनालय आणि एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आले. 

किती प्रवासी कोरोनाबाधित? 
वंदे भारत अभियानंतर्गत भारतात आलेले किती प्रवासी विमानात बसण्याआधी कोरोना निगेटिव्ह होते? भारतात आल्यावर झालेल्या चाचणीत किती प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. अशा प्रवाशांचा तपशील पुढील सुनावणीला दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले. याचिकेवर पुढील सुनावणी  4 जूनला होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com