मुंबई : राज्यभरातील गृहरक्षक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. सोमवारी राज्याच्या मुख्य सचिवांशी मागण्यांसंदर्भात झालेली बैठक निष्फळ झाल्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात १९४६ मध्ये गृहरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. राज्यात आज ५६ हजारांहून अधिक गृहरक्षक आहेत. गेली ७४ वर्षे सेवा दिल्यानंतर सरकारने गृहरक्षक विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना नोटीस काढून आपत्र घोषित करण्यात आले. २००८ पासून १६ हजारांहून अधिक गृहरक्षक कर्मचारी अपात्र ठरले. अनेक कर्मचाऱ्यांच्या हातचे काम गेल्याने ते बेरोजगार झाले.
गृहरक्षक दलात १० हजारांहून अधिक महिला कर्मचारी आहेत. गृहरक्षक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावरदेखील उपासमारीची वेळ येणार आहे. न्यायासाठी या हे आंदोलन सुरू केले असून न्याय मिळेपर्यंत ते सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
विविध कारणांनी अपात्र गृहरक्षक कर्मचाऱ्यांना विनाअट तात्काळ सेवेत रुजू करून घेण्यात यावे, गृहरक्षकांना कायम स्वरूपी काम मिळावे, गृहरक्षक कर्मचाऱ्यांचे मानधन बंदोबस्तानंतर आठवडाभरात मिळावे, गृहरक्षकांना पोलिस भरतीमध्ये पाच टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्यात यावे. गृहरक्षकांची दर तीन वर्षांनी होणारी पुनर्नोंदणी बंद करण्यात यावी, मानसेवी पद पूर्ववत ठेवावे, आंदोलकांवर झालेली कारवाई मागे घेण्यात यावी.
प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्याशी मागण्यांसंदर्भात चर्चा झाली; मात्र त्यांनी निधीची कमतरता असल्याचे सांगत हात वर केले. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- रामलिंग पुराणे, अध्यक्ष, बसव प्रतिष्ठान
Home guards Elgar against Government
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.