पालघर झुंडबळीतील बाल आरोपींबाबत अहवाल सादर; घटनेबाबत सीआयडीने दिले स्पष्टीकरण

पालघर झुंडबळीतील बाल आरोपींबाबत अहवाल सादर; घटनेबाबत सीआयडीने दिले स्पष्टीकरण

मुंबई : तीन महिन्यापूर्वी पालघरमध्ये दोन साधूंसह तिघांची जमावाने केलेल्या हत्या राज्यातच नव्हे तर देशात गाजले होते. या घटनेने अवघा देश हादरला होता. देशविदेशातून या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. तपासांती आज राज्य सीआयडीने भिंवडी बाल न्यायालयात दोन बाल आरोपींविरोधात अंतिम अहवाल दाखल केला. हा हल्ला धार्मिक वादातून झाला नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पालघरमध्ये कासा गावाजवळ घडलेल्या या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी यामध्ये अकरा बाल आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोघांच्या तपासाचा अंतिम अहवाल भिंवडी बाल न्यायालयात दाखल केला. दोघांवरही हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, दंगल पसरवणे आदीबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. बारा ते सतरा वयोगटातील सर्व बाल आरोपी सध्या भिंवडी रिमांड होममध्ये आहेत. 

या प्रकरणात कोणताही धार्मिक किंवा जातीय वादातून झाला नाही, मुले पळविण्याची टोळी परिसरात सक्रिय आहे या अफवेतून हल्ला झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. पोलिसांनी एकूण 154 प्रौढ आरोपी अटक केली असून त्यापैकी 126 जणांविरोधात दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70), सुशीलगिरी महाराज (36) आणि निलेश तेलगडे (30) यांची प्रक्षुब्ध जमावाने 16 एप्रिल रोजी जबर मारहाण करून हत्या केली होती, असा गुन्हा पोलिसांनी नोंदविला होता.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com