

Maharashtra Rain
ESakal
मुंबई : मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. तर काही भागात पावसाची ये-जा सुरु आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे असल्याचा इशारा जारी केला आहे.