Mumbai : ठाणे,रायगड,पालघर जिल्ह्यातील नदीच्या पाणी पात्रात वाढ; नद्यांनी इशारा पातळी गाठली

पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.
Mumbai
MumbaiSakal

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यात मंगळवार पासून पावसाचा जोर वाढला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन बुधवारी सकाळी 15.60 मीटर वर उल्हास नदी वहात आहे.

16.50 नदीची धोका पातळी आहे. तर काळू नदीने धोका पातळी गाठली असून 102.20 मीटरने नदी वहात आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.

Mumbai
Mumbai Rain Update : पावसामुळे मध्य रेल्वेला वाहतुकीला ब्रेक! शंभर पेक्षा जास्त लोकल गाड्या रद्द

यावर्षी पावसास उशिराने सुरवात झाली असली तरी सातत्याने पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. मंगळवारपासून ठाणे जिल्ह्यात पावसाची

संततधार सुरू असून सायंकाळनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी देखील शहर तसेच ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम होता. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी नद्या, नैसर्गिक नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

Mumbai
Mumbai Rain : पाऊस बेफाम, मुंबई जाम!

बुधवारी सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील उल्हास नदीच्या पाणी पातळी गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाली आहे.

उल्हास नदीची इशारा पातळी 16.60 मीटर इतकी आहे. तर धोका पातळी 17.50 मीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उल्हास नदी बदलापुरात 15.60 मीटर पातळीवरून वाहत होती. तर याच नदीवर जांभूळ आणि मोहन येथे नोंदवलेली नदीची पातळी इशारा पातळीच्या जवळ गेल्याचे दिसून आले आहे.

अनुक्रमे 8 व 12.50 मीटरने येथील पाणी वहात आहे. तर त्यांची धोका पातळी की अनुक्रमे 9 व 13 मीटर इतकी आहे. बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला या नदीमुळे पुराचा फटका बसत असून या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai
Mumbai Local Live Update: पनवेलला जाणाऱ्या गाड्या बंद, पाणी साचल्याने बदलापूर आणि अंबरनाथमधील वाहतूक ठप्प

तसेच काळू नदी टिटवाळा बंधाऱ्याजवळ इशारा पातळीवर वाहते आहे. काळू नदीची इशारा पातळी 102 मीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काळू नदी 102.20 मिटर या पातळीवरून वाहत होती. काळू नदीची धोका इशारा पातळी 103.50 मीटर इतकी आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास काळू नदी धोक्याच्या पातळीवरून वाहण्याची शक्यता आहे. तर

असाच पाऊस कायम राहिल्यास तसेच रायगड जिल्ह्यातील नेरळ, माथेरान आणि कर्जत परिसरात मोठा पाऊस झाल्यास उल्हास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com