

Mumbai Local Kavach 5.0 System
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे सेवेत लवकरच 'कवच ५.०' ही अत्याधुनिक स्वदेशी ट्रेन संरक्षण प्रणाली दाखल होणार आहे. या प्रणालीमुळे लोकल गाड्यांमधील वारंवारता सध्याच्या तीन मिनिटांवरून दोन मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. परिणामी लोकल फेऱ्यांची संख्या ३,२५४ वरून सुमारे चार हजारांपर्यंत वाढविता येणार असल्याने महामुंबईतील लाखो प्रवाशांना दिलासा मिळण्याबरोबरच सुरक्षिततेतही मोठी भर पडणार आहे.